You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमोठ्या प्रमाणात पुस्तकांच्या प्रती नॉशन प्रेसमधून थेट घेतले जाऊ शकतात आणि पुस्तके Amazon आणि FlipKart वर देखील उपलब्ध आहेत, ज्याच्या लिंक खाली दिल्या आहेत.
रस्त्यावरील अपघातांची कारणे आणि त्याचा देशभरात व्यापक प्रसार होण्यासाठी या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले जात आहे.
आज भारत सर्वाधिक अपघाती मृत्यूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि हे आपल्यापैकी कोणालाही मान्य नसावे. रस्त्यांवर दररोज 450 हून अधिक मृत्यू होत असताना, ड्रायव्हिंग हा आपल्या सर्वांसाठी जे वेगवेगळ्या स्वरूपात रस्ते व्यापतात कधी ड्रायव्हर कधी सायकल स्वार तर कधी फक्त पादचारी म्हणून , सर्वात धोकादायक व्यवसाय झालेला आहे.
आपल्या देशात घडणार्या अनेक अपघातांचा तपशील पाहिल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की 80% पेक्षा जास्त अपघातांमध्ये एक सामान्य पॅटर्न असतो, ज्याची पुनरावृत्ती देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी होत असते.
आम्ही असे सर्व धोके ओळखले आहेत, जे या अपघातांसाठी जबाबदार आहेत आणि त्या परिस्थितीत मार्गावर संभाव्य सुरक्षितेची चर्चा केली आहे. कोणताही ड्रायव्हर सहजपणे स्वतःशीअशा धोक्यांचे संबंध जोडू शकतो, कारण ते प्रत्यक्षात रस्त्याचे वास्तव्य आहे - ज्याचा आपण आज सामना करत आहोत.
आपल्या मुलांना आधुनिक वाहने भेट देण्यापूर्वी पालकांना हे पुस्तक त्यांच्या मुलांना रस्त्यांवरील सुरक्षितते साठी एक महत्त्वाची सुरक्षा मार्गदर्शिका म्हणून दिले पाहिजे. आपल्याला आपल्या देशात अनेक मौल्यवान जीव, जे रस्त्यावर दररोज गमावले जातात, वाचविण्यासाठी रस्ता सुरक्षा जागरुकता मोहीम तयार करायची आहे, जी दीर्घकाळ पूर्वीपासून प्रलंबित आहे. #halfroadaccidentsby2025
It looks like you’ve already submitted a review for this book.
Delete your review
Your review will be permanently removed from this book.Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.ए डी जोशी
ए डी जोशी लेखक गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ रस्ता सुरक्षेबद्दल प्रचार आणि जनजागृती करत आहेत. अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांच्या काही मुलांचा मृत्यू, या पालकांच्या वेदना आणि व्यथा - या सर्व गोष्टींनी लेखकाला ही कृती घडवून आणण्यास भाग पाडले आहे.
रस्ते अपघाताशी संबंधित बहुतेक मृत्यू टाळता येण्या योग्य असतात आणि ते केवळ अज्ञानामुळे आणि समजदारी च्या अभावामुळे घडत असतात. आपल्या देशात जागरुकता पसरवण्याची अत्यंत त्वरित गरज झाली आहे आणि आगामी पायाभूत सुविधांतील सुधारणांमुळे आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
याहून अधिक क्लेशदायक बाब म्हणजे दुर्दैवाने भारत हा जगातील सर्वाधिक अपघाती मृत्यूंमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे आणि हे आपल्यापैकी कुणालाही मान्य नसावे. आपल्या कपाळावरील हा काळा डाग दूर करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत.
हे पुस्तक लेखकाचे रस्ता सुरक्षितते साठी योगदान आहे आणि जर त्यातील मजकूर देशातील एखाद्यावर पण प्रभाव टाकू शकेल तर हे आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी असेल. #halfroadaccidentsby2025
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.